विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार 2023 | Marathi Suvichar for Students January 6, 2023January 5, 2023 by Marathiwayयशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.अंतर्मुखता ही खऱ्या शिक्षणाची सुरुवात आहे.विद्या हीच एक शक्ती आहे.विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनेल.कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे.जीवन म्हणजे प्रेम आणि श्रमरूपी सरितांचा संगम होय.विद्यारूपी अंगठी मध्ये विनयरुपी रत्न चमकत असते.नशिबाचे दुसरे नाव विचार आहे.विद्यासारखी शरीराला शोभा देणारी दुसरी कोणतीच वस्तू नसते.जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ,साहस व पात्रतेची कसोटी आहे.विद्या म्हणजे कामधेनु आहे.ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.विद्या वाचून जीवन फुकट आहे.मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार.विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.विद्यादान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान आहे. अन्नाने क्षणिक तृप्ती होते परंतु विद्येमुळे जीवनभराचे सुख प्राप्त होते.तुमचे सौख्या तुमच्या विचारावर अवलंबून असते.केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे; ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या.निरुपयोगी जीवन म्हणजे अकाली मृत्यू.विद्या रुपी धनाची कोणी चोरी करू शकत नाही.अंत:करणाची सुंदरता सुंदर विचारावर अवलंबून असते.विद्यारूपी रत्नाची किंमत बुद्धिमान मनुष्यच करू शकतो मुर्खाला त्याची किंमत समजत नाही.वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो पण मग शिक्षणाने मनुष्य पक्का होतो.पवित्र विचारांचे नेहमी मनन केले पाहिजे आणि वाईट संस्कार दूर केले पाहिजेत.ज्या प्रकारे प्रकाश अंधार नाहीसा करतो त्या प्रकारे विद्येच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो.जीवन म्हणजे फुलांची सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.विद्या विनयेन शोभते.खरे शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला.विचार शून्यता ही आजच्या पिढीची सार्वजनिक आपत्ती आहे.मनुष्य कसा मरतो ते महत्त्वाचे नाही पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्त्वाचे आहे.शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाज उपयोगी विकास.मानवी इतिहास हा मुख्यत्वे विचारांचा इतिहास आहे.आयुष्य ही चैन नसून एक कर्तव्य आहे.मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो.आयुष्यातील अडचणी सोडवण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.जीवनाच्या प्राथमिक अवस्थेत येणारी संकटे उज्वल भवितव्याची निदर्शक असतात.या जगात जे जे उपलब्ध आहे त्या सर्वांमध्ये विद्येचा साठा सर्वात अधिक आहे.जीवन हा एक घडवला जात असलेला सोन्याचा दागिना आहे तो जितका काळजीपूर्वक घडवला जाईल तितका अधिक शोभेल.शिक्षणाच्या उदात्त हेतूत केवळ ज्ञान अपेक्षित नसून कृती देखील अपेक्षित असते.विद्या म्हणजे मानवाची अनुपम कीर्ती आहे.जीवन हा हास्य आणि अशोक यांचा सुरेख संगम आहे.शिक्षण आणि सतचरित्र म्हणजे आत्मरूपी जहाजाचा नांगर होय.खरे शिक्षण फक्त सत्याचे दर्शनच घडवत नाही तर ते अमलात आणते आणि तेच त्याचे पूर्ण ध्येय असते.जगामध्ये कोणती वस्तू चांगली किंवा वाईट असत नाही आपले विचार ती वस्तू चांगली किंवा वाईट बनवतात.जो मनुष्य विचार कमी करतो तो अधिक बोलतो आणि जो मनुष्य विचार आहे तोयुवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की ज्यामुळे ते स्वतःपुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील.आळसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चायाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो.जे शिक्षण उपजीविकेचे साधन असते ती कला असते. आणि जे शिक्षण जीवन विकासाचे साधन असते ती विद्या असते.मनुष्याची वाढ ही अवयवांनी होत नाही तर विचारांनीच होते.जो मनुष्य विचार कमी करतो तो अधिक बोलतो आणि जो मनुष्य विचार करतो तो कमी बोलतो.Share this:Click to share on Reddit (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Pinterest (Opens in new window)