मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा.
– स्वामी विवेकानंद
इष्ट गोष्टींचा अभ्यास आणि अनिष्ट गोष्टींचा त्याग,यामुळेच मनुष्य यशस्वी ठरतो.
-भगवद्गीता
द्वेष भावना सुडाने नष्ट होत नाही.तर ती प्रेमानेच नष्ट होते. – गौतम बुद्ध
– गौतम बुद्ध
विद्या अमर्याद आहे म्हणून आपण जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे.
जे कशावरच श्रद्धा ठेवत नाहीत ते कायमचे भ्रष्ट ठरतात.
– भगवान महावीर
सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते.
अन्यायाशी तडजोड हे सर्वात मोठे पाप आहे.
– सुभाषचंद्र बोस
आळस,अज्ञान आणि अंधश्रद्धा हे माणसाचे मोठे शत्रू आहेत.
– विनोबा भावे
माझे ते खरे न म्हणता,खरे ते माझे म्हणा. – साने गुरुजी
– विनोबा भावे
अहिंसा हे भूतलावरचे प्रबळ सामर्थ्य आहे.
– महात्मा गांधी
सचोटीचा मनुष्य निर्माण करणे ही परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.
ध्येय आपणहून निरुद्योगी माणसाच्या हातावर पडत नाही.
– लोकमान्य टिळक
क्रांती ही समाजाने समाजासाठी करायला हवी.
अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते आणि कार्यक्षमता वाढते.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
– समर्थ रामदास
उंच ठिकाणी बसला म्हणून जवला गरुड होत नाही.
निरुपयोगी जीवन म्हणजे अकाली मृत्यूच.
स्वभाव जन्मतः घडलेला नसतो तो घडवावा लागतो.
जीवन ही एक समर भूमी आहे,त्यात लहान मोठ्या जखमा होणारच.
ज्ञान,सौंदर्य आणि साधुत्वा ही जीवनाची तीन मूल्ये आहेत.
वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील सर्व संधी गमावणे.
ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्यांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे.
– बाबासाहेब आंबेडकर
मोठमोठी कामे शक्तीने होत नाहीत तर ती सहनशक्तीने होतात.
ज्या दिवशी आपली थोडीसुद्धा प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असे समजावे.
– नेपोलियन
जीवन ही चैनीची गोष्ट नसून कर्तव्याची भूमी आहे.
त्यागातच वैभव आहे, संचयात नाही.
शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती.
दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आड येत नाही तेच खरे स्वातंत्र्य.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.
– साने गुरुजी
तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृद्धापकाळाच्या नावावरचे कर्ज असते,ते सव्याज फेडावे लागते.